वैभववाडीतील स्टॉल धारकांना दिलासा…

332

वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडीतील स्टॉल धारकांना गणपती बाप्पा पावला आहे. ११ सप्टेंबर रोजी होणारी स्टॉल हटाव मोहीम गणेशोत्सव होईपर्यंत होणार नाही त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

ऐन गणपतीसणाच्या तोंडावर वैभववाडीतील स्टॉल हटाव मोहीम राबविली जाणार होती. तहसीलदार दिप्ती देसाई यांनी नगरपंचायतीला आपल्या हद्दीतील स्टॉल हटाव करण्याचे आदेश दिले होते तर महसुल जागेतील स्टॉल महसूल विभाग स्वतः काढून घेणार होते.

सुशोभीकरण्याच्या नावाखाली नगरपंचायतीने फेब्रुवारी महिन्यात स्टॉल हटाव मोहीम राबवली होती मात्र जून महिन्यापासून एक- एक स्टॉल या ठिकाणी बाजारपेठेत स्टॉल उभारून आता जवळजवळ 50 ते 55 स्टॉल धारकांनी शासकीय जागेत स्टॉल उभारून पूर्वीप्रमाणेच बाजारपेठेत स्टॉलधारकांनी व्यापली आहे.