कोकण रेल्वेमार्ग पूर्ववत,सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर घसरलेले इंजिन रूळावर…….

10

रत्नागिरी/प्रतिनिधी:-

उक्षी टनेल परिसरात घसरलेले कोकण रेल्वे मार्गावर इंजिन अवघ्या सहा तासात पूर्ववत करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे अडकलेली राजधानी एक्सप्रेस रत्नागिरीकडे मार्गस्थ झाले आहे.याबाबतची माहिती रेल्वेचे माहिती अधिकारी सचिन देसाई यांनी दिली. उक्षी टनेल परिसरात रेल्वेचे इंजिन घसरल्यामुळे रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. याबाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने तात्काळ धाव घेतली, आणि इंजिन पूर्वरत केले आहे.