भारतात येणाऱ्या ब्रिटिश प्रवाशांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार…

12

नवी दिल्ली/प्रतिनिधी:-

भारत सरकारने शुक्रवारी जाहीर केले आहे, की 4 ऑक्टोबरपासून ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना भारतात 10 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल. याशिवाय, ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या कोरोना तपासणीसाठी विमानतळावर आरटी-पीसीआर चाचण्याही केल्या जातील. याशिवाय, ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा आरटी-पीसीआर करावी लागेल.