मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्याला झोडपले; भातशेतीचे नुकसान…

15

वैभववाडी/प्रतिनिधी:-

सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. विजांच्या कडकडासह झालेल्या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वैभववाडी बाजारपेठेत ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

वैभववाडी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. तालुक्यात भात कापणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. परंतु पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामात व्यत्यय येत आहे. कापलेले भात भिजले तसेच पावसामुळे ठिकठिकाणी भातशेती आडवी झाली आहे. त्याचबरोबर नदी नाल्या नजीकची भातशेती पुराचे पाणी गेल्याने जमीनदोस्त झाली आहे. पावसाने जोर असाच कायम ठेवल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.